Latest Post

कळंब.. प्रतिनिधी  अमर ताटे 



पॉझिटिव्ह निघालेले कोव्हिड चे रुग्ण बिनधास्त पने बाजारपेठेत फिरू लागले असून, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, त्यामुळे होम आयसुलेशनची  सुविधा बंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सतीश टोणगे यांनी केली आहे.
    उपविभागीय अधिकारी यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराजवळच्या  गावामध्ये कोव्हिड च्या रुग्णामध्ये  वाढ होऊ लागली आहे, व त्यांचा संपर्क हा शहरातील नागरिक , व्यापारी यांच्याशी होत असल्याने शहरातील रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह निघालेले रुग्ण होम आयसुलेशन च्या नावाखाली बिनधास्त पने शहरात फिरू लागले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना प्रशासनाची भीती राहिलेले नाही, शासनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. या पुढील काळा त रुगणसंख्या कमी करण्यासाठी   पॉझिटिव्ह निघणाऱ्या प्रत्येक रुग्णांस शासकीय कोव्हिड सेंटर मध्ये ठेवण्याची मागणी नगरसेवक सतीश टोणगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





 दिनांक २२/०८/२०२०

( प्रतिनिधी परवेज मुल्ला ) : – कळंब शहराच्या मध्यवर्ती विविध खेळासाठी कोट्यावधी रूपये खर्चून बांधलेले क्रिडा संकूल अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे सध्या विविध समस्यानीं घेरले असून त्या ठिकाणी आता दारूडयांनी त्यांचा अड्डाच बनवून ठेवल्याचे चित्र दिसत आहे .
सविस्तर माहिती अशी की कळंब तालूक्यातील विविध प्रकारच्या खेळाडू सांठी सराव करण्यासाठी जवळ पास एवढ्या मोठया जागेत भव्य क्रिडा संकूल असून त्या क्रीडा संकुलाचे जवळपास ७० लाख रुपये खर्चुन मोठी इमारत गेल्या तीन वर्षापुर्वीच उभारली आहे इतर खेळांसाठी रिकामा परिसर ही मोठा आहे मात्र जिल्हा क्रिडा अधिकाऱ्याच्या दुर्लक्षीत धोरणामुळे या क्रिडां संकुलामध्ये सध्या चारही बाजूंनी घाणीचे साम्राज्य व झाडाझुडप्याने रिकामे मैदान व्यापून गेले आहेत त्याच परिसरात हातभट्टी चे दुकान सुदधा कांही नागरीकांनी थाटले असून त्यामुळे सध्या क्रिडा संकुलाच्या भव्य इमारतीच्या समोरच दारूड्यांचा मोठया प्रमाणात गोधळ दररोजच चालू असतो, इमारतीचे दरवाजे, खिडक्या चोरट्यांनी गायब केल्या आहेत कंपाऊड वॉलचे लोखंडी गेटही चोरीला गेले आहे त्यामुळे शासनाने तालुक्यातील विविध प्रकार च्या खेळाडूसांठी लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या क्रिडा संकू लाची अवस्था अतिशय दयनीय झालि असून कमीत कमी जिल्हा अधिकांर्‍यांनी च या गंभीर बाबीकडे लक्ष घालून विविध समस्या च्या विळख्यात सापडलेल्या क्रिडा संकूल खेळाडू्साठी वाचवावे अशी मागणी कळंब शहरसीयांकडून केली जात आहे

कोरोना योद्धा पुरस्काराने पत्रकार हनुमंत पाटुळे यांना सन्मानीत 

खामसवाडी दि. २(प्रतिनिधी)कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे दि. १आँगस्ट रोजी साहीत्यरत्न लोकशाहीर डाँ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व जयंती निमित्त जनस्वराज्य फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र युवा पत्रकार संघ यांच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चे औचित्य साधून कोरोना काळात कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा "कोवीड योध्दा" पुरस्कार जनस्वराज्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.लहु पारवे सर यांच्या हस्ते मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष लहु पारवे सर,गावचे उपसरपंच प्रभाकर शेळके,बाबु नाना शेळके,पोलीस जमादार शौकत पठाण,पत्रकार शिवाजी बोबडे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोळी, बंडु ताटे,संपत थोरात,साहेबराव गायकवाड सुमीत वाघे, मकबुल शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कळंब दि.9/07/2020


राहगृह येथील तोडफोडीचा लाल पँथर संघटनेच्या वतीने निषेध 

लाल पँथर संघटनेच्या वतीने राजगृह येथील तोडफोडीचा निषेध नोंदविण्यात आला व कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना निवेदन देण्यात आले . मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने केलेल्या तोडफोड तसेच घराच्या काचाची तोडफोड करण्यात आली आहे यात घराच्या परिसरातील CCTV कॅमेरा ची तोडफोड करण्यात आली आहे.राजगृह हे समस्त आंबेडकरी जनतेचे ऊर्जास्रोत आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर पुस्तकांसाठी तयार केले आहे.आणि येथे अशा प्रकारे तोडफोड केल्याने समस्त आंबेडकरी जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे.तरी तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तात्काळ अटक करावी व अॅड बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या पुर्ण कुटुंबाला Z + सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी लाल पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केली आहे .या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सौ माया शिंदे ,बालाजी गायकवाड, सुनिल कांबळे , संगिता बिक्कड , सुनिल गायकवाड,शरद झोंबाडे, यांच्या स्वाक्षर्या आहेत.

कळंब दि.९/०६/२०२९


*कळंब तालुका व्यापारी महासंघाचे विवीध मागण्याचे निवेदन
   बँकेचे व्याज माफ करावे 
कळंब 
तालुका व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदण मा.उपविभागिय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात आले. 
     या निवेदना मध्ये  विविध मागण्या मांडण्यात आल्या.
जिल्ह्यातील व्यापाऱ्याचे प्रतिष्ठाणे स्थानीक स्वराज्य संस्थेच्या जागेत आहेत. त्यांचे एक वर्षाचे भाडे माफ करावे.
 लॉक डाऊन काळातील विज बील माफ करावे.
 लॉक डाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे बॅकेचे व्याज माफ करावे.
सर्व व्यापाऱ्यांचा व्यवसाय कर माफ करावा.
जी.एसटी आदा करण्याची मुदत सहा महीन्यानी वाढवावी.
केंद्र सरकारने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करास सहा महीणे मुदत वाढ दयावी.आशा प्रकारच्या मागण्या मांडण्यात आल्या. 
        यावेळी तालुका महासंघाचे अध्यक्ष श्री नंदकिशोर मोरे, सचिव बालाजी बावळे, उपअध्यक्ष प्रताप शिंदे शहर अध्यक्ष मयुर रुणवाल,किशोर गोरे, गणेश लाखे, सतीश भांडे व इतर व्यापारी हजर होते.

कळंब दि.९/०६/२०२०

आंदोलन करणार.....विष्णुदास काळे

कळंब 
तालुक्यातील  प्रमुख शाखाध्यक्ष तालुकाध्यक्ष  यांची काल बैठक झाली लॉक डाऊन च्या काळात संघटनेत थोडी मरगळ आलेली होती पण आता सर्व मरगळ बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पेटून उठण्याचे काम उस्मानाबाद जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत असे असताना देखील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज विषय बँकाकडून संथ गतीने चालू आहे तसेच नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात बँका टाळाटाळ करत आहेत कृषी विभागाचे दुर्लक्ष ेतकर्‍यांकडे चालू आहे या सर्व बाबींचा विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात भूमिकेत आहे असे ठरवण्यात आले 
        या बैठकीस स्वभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णुदास काळे तालुकाध्यक्ष कमलाकर पवार जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत दादा समुद्रे कळंब तालुका उपाध्यक्ष अजय शिंदे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख याही खाँ पठाण कळंब तालुका सरचिटणीस पंकेश पाटील माणिक घाटोळे सिताराम शितोळे सचिन डावखरे नाना पंचाळ अशोक माळी उमेश महाजन आदी शेतकरी उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget